नको रे असे गीत सामोरी आणू....
नको रे असे गीत सामोरी आणू,
नको रे अशी तार गीतात ताणू,
आताच लागे, कुठे सावरु मी,
नको वेदनेचे, पुन्हा ताट आणू ।
नको आठवू पुन्हा त्या क्षणांना,
किती कोवळ्या भावना जाण ना,
शब्दांनी त्यांना स्पर्शू नको रे,
कौमार्य त्यांचे सांभाळू या ना ।
नको आरसा आणू माझ्यासमोरी,
नको वाचू वादळे घोंघावणारी,
भीती वाटते माझीच रे मला ती,
कोण ती लपूनी बसे अंतरी ।
असू दे दुरावा, नको खंत त्याची,
जरा आवरूया ओढ ती मनाची,
किती टोचरे ते तरी सत्य आहे,
अरे तीच ओळख, आहे स्वतःची ।
(सौ. शैलजा शेवडे)
नको रे अशी तार गीतात ताणू,
आताच लागे, कुठे सावरु मी,
नको वेदनेचे, पुन्हा ताट आणू ।
नको आठवू पुन्हा त्या क्षणांना,
किती कोवळ्या भावना जाण ना,
शब्दांनी त्यांना स्पर्शू नको रे,
कौमार्य त्यांचे सांभाळू या ना ।
नको आरसा आणू माझ्यासमोरी,
नको वाचू वादळे घोंघावणारी,
भीती वाटते माझीच रे मला ती,
कोण ती लपूनी बसे अंतरी ।
असू दे दुरावा, नको खंत त्याची,
जरा आवरूया ओढ ती मनाची,
किती टोचरे ते तरी सत्य आहे,
अरे तीच ओळख, आहे स्वतःची ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments
किती कोवळ्या भावना जाण ना,
शब्दांनी त्यांना स्पर्शू नको रे,
कौमार्य त्यांचे सांभाळू या ना ।
...khup ch Apratim oli aahet ya.
..nitaantsundar kavita.